पुढे भगवान श्रीकृष्णांनी सौराष्ट्रात समुद्रतिरी द्वारका नगरीची स्थापना केली आणि तेथे आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.उल्लेखनीय आहे की कृष्णाला 8 बायका अर्थात रुक्मिणी, जांबावंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रबिंदा, सत्य, भद्र आणि लक्ष्मण ह्या होत्या. ..पुढे महाभारताच्या युद्धप्रसंगी पांडवांची बाजू घेऊन त्यांच्या विजयास हातभार लावला व अधर्मचा नाश करून धर्माचे राज्य स्थापन केले. महाभारताच्या युद्धामध्ये त्यांनी अर्जुनाच्या सारथीची भूमिका साकारली आणि भगवद्गीतेचे ज्ञान दिले जे त्यांच्या जीवनातील सर्वोत्कृष्ट रचना मानली जाते. महाभारताच्या युद्धानंतर 36 वर्षांनी म्हणजेच वयाच्या 124 व्या वर्षी गांधारीच्या शापाने एका शिकाऱ्याच्या हातून बाण लागल्याने भगवान श्री कृष्णाने आपल्या लीला संपविल्यात.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:
Post a Comment