मित्रांनो सध्या कोविड 19 या महामारीने सर्व जगाला lockdown करून टाकलयं..गल्ली पासून दिल्ली पर्यंत आणि चीन पासून अमेरिका पर्यंत भल्याभल्याना आपल्या घरात कैद करून टाकलयं..त्यामुळे याचा आपल्या आरोग्यवर दूरगामी परिणाम होतोय.
मित्रांनो प्रत्येकाचं आरोग्य हे प्रत्येकाच्या हातातच असते.मग ते शारीरिक असो किंवा मानसिक असो."तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" असे आपण वाचलेच असेल,आणि हि ओळ अगदी आपल्या बाबतीत खरी ठरते.माणसाला कुठलेही व्यसन जडण्यामागे तो स्वतःच जबाबदार असतो,जबाबदार असतात त्याच्या वाईट सवयी पण दोष देतो ते परिस्थितीला ,हि केवळ एक पळवाट आहे.असो हे झालं शरीरीक आरोग्याबाबत.
मी तर म्हणतो माणसाच्या शारीरिक आरोग्यापेक्षाही त्याचे मानसिक आरोग्य उत्तम असनं हे कधीही चांगलंच.कारण माणूस शारीरिकदृष्ट्या धडधाकड असला आणि मनोरुग्ण असला तर त्याच्या शरीरीक क्षमतेचा तो पूर्णर्थाने वापर करूच शकत नाही, तसेच त्याच्या कडून काही विधायक कार्य घडणे देखील दुरापस्तच म्हणावे लागेल.समाजातील घडत असलेले गुन्हे,अत्याचार ,बलात्कार हे मानसिक अनारोग्याची लक्षणे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
इंग्रजीत एक म्हण आहे "sound mind in sound body".निरोगी शरीरात निरोगी मन वास करते....हे जर खरं असेल तर बळी तो कान पिळी या म्हणी प्रमाणे सुदृढ शरीराच्या व्यक्तींकडून बहुतेकदा निर्बलांवर अत्याचार होतात,हे हि तेवढंच खरं.मग माणसांनी निरोगी राहू नये का??सर्वच निरोगी माणसे अत्याचारी असतात का?..तर नाही..आपण निरोगी (शारीरिक दृष्ट्या आरोग्य संपन्न) आणि सुदृढ (शारीरिक दृष्ट्या बलदंड )यांच्यात गफलत करत आहोत.
सामाजीक स्वास्थ टिकवून ठेवायचे असेल तर निरोगी ,सुदृढ शरीराबरोबरच मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे.."इच्छा असेल तर मार्ग दिसेल" असे म्हणतात .येथे इच्छा हि शारीरिक व मानसिक अशा दोघांच्या अवस्था दाखवते...दोघांपैकी एक जरी कमकुवत असेल तर इप्सित साध्य होणार नाही..तुमच्या मनात खूप इच्छा आहेत..काहीतरी करून दाखवण्याची पण तुमचे शरीर जर तुम्हाला साथ देत नसेल तर ..? आणि शरीर धडधाकड आहे,कोणतेही काम सहज करू शकतं पण तुमचं मनचं त्यासाठी तयार होत नसेल तर ते शरीर धडधाकड असून काय कामाचं..? म्हणून माणसाच्या पर्यायाने समाजाच्या आरोग्यासाठी निरोगी शरीर व निरोगी मन दोन्हीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे व्यायाम, शरीराचा व मनाचा देखील.....
शारीरिक व्यायामासाठी प्रामुख्याने धावणे, चालणे,पोहणे,सूर्यनमस्कार,जोर-बैठका घालणे इ.जे आपल्या वयाप्रमाणे प्रकृतीला झेपेल ते करावे.आणि मानसिक आरोग्यासाठी योगासने,प्राणायाम,ध्यान ,चांगल्या पुस्तकांचे वाचन,आवडीची गाणी,उपदेशपर चित्रपट,धार्मिक ग्रंथांचे डोळसपणे वाचन,जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन..इ करू शकतो..
तर चला मग व्यक्ती व्यक्ती आरोग्यसंपन्न बनू या..राष्ट्राला बलदंड बनवू या...कोरोनाला हरवू या..
🙏🙏 प्रमोद बोरसे🙏🙏
मित्रांनो प्रत्येकाचं आरोग्य हे प्रत्येकाच्या हातातच असते.मग ते शारीरिक असो किंवा मानसिक असो."तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" असे आपण वाचलेच असेल,आणि हि ओळ अगदी आपल्या बाबतीत खरी ठरते.माणसाला कुठलेही व्यसन जडण्यामागे तो स्वतःच जबाबदार असतो,जबाबदार असतात त्याच्या वाईट सवयी पण दोष देतो ते परिस्थितीला ,हि केवळ एक पळवाट आहे.असो हे झालं शरीरीक आरोग्याबाबत.
मी तर म्हणतो माणसाच्या शारीरिक आरोग्यापेक्षाही त्याचे मानसिक आरोग्य उत्तम असनं हे कधीही चांगलंच.कारण माणूस शारीरिकदृष्ट्या धडधाकड असला आणि मनोरुग्ण असला तर त्याच्या शरीरीक क्षमतेचा तो पूर्णर्थाने वापर करूच शकत नाही, तसेच त्याच्या कडून काही विधायक कार्य घडणे देखील दुरापस्तच म्हणावे लागेल.समाजातील घडत असलेले गुन्हे,अत्याचार ,बलात्कार हे मानसिक अनारोग्याची लक्षणे आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
इंग्रजीत एक म्हण आहे "sound mind in sound body".निरोगी शरीरात निरोगी मन वास करते....हे जर खरं असेल तर बळी तो कान पिळी या म्हणी प्रमाणे सुदृढ शरीराच्या व्यक्तींकडून बहुतेकदा निर्बलांवर अत्याचार होतात,हे हि तेवढंच खरं.मग माणसांनी निरोगी राहू नये का??सर्वच निरोगी माणसे अत्याचारी असतात का?..तर नाही..आपण निरोगी (शारीरिक दृष्ट्या आरोग्य संपन्न) आणि सुदृढ (शारीरिक दृष्ट्या बलदंड )यांच्यात गफलत करत आहोत.
सामाजीक स्वास्थ टिकवून ठेवायचे असेल तर निरोगी ,सुदृढ शरीराबरोबरच मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे.."इच्छा असेल तर मार्ग दिसेल" असे म्हणतात .येथे इच्छा हि शारीरिक व मानसिक अशा दोघांच्या अवस्था दाखवते...दोघांपैकी एक जरी कमकुवत असेल तर इप्सित साध्य होणार नाही..तुमच्या मनात खूप इच्छा आहेत..काहीतरी करून दाखवण्याची पण तुमचे शरीर जर तुम्हाला साथ देत नसेल तर ..? आणि शरीर धडधाकड आहे,कोणतेही काम सहज करू शकतं पण तुमचं मनचं त्यासाठी तयार होत नसेल तर ते शरीर धडधाकड असून काय कामाचं..? म्हणून माणसाच्या पर्यायाने समाजाच्या आरोग्यासाठी निरोगी शरीर व निरोगी मन दोन्हीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे व्यायाम, शरीराचा व मनाचा देखील.....
शारीरिक व्यायामासाठी प्रामुख्याने धावणे, चालणे,पोहणे,सूर्यनमस्कार,जोर-बैठका घालणे इ.जे आपल्या वयाप्रमाणे प्रकृतीला झेपेल ते करावे.आणि मानसिक आरोग्यासाठी योगासने,प्राणायाम,ध्यान ,चांगल्या पुस्तकांचे वाचन,आवडीची गाणी,उपदेशपर चित्रपट,धार्मिक ग्रंथांचे डोळसपणे वाचन,जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन..इ करू शकतो..
तर चला मग व्यक्ती व्यक्ती आरोग्यसंपन्न बनू या..राष्ट्राला बलदंड बनवू या...कोरोनाला हरवू या..
🙏🙏 प्रमोद बोरसे🙏🙏
